Pages

Sunday, June 16, 2013

आश्चर्य_वाटतं...!!

आश्चर्य वाटतं भारत देश अजूनही अस्तित्वात आहे...!!!
होय 
आश्चर्य वाटतं तो अजूनही कार्यरत आहे...

प्रत्येक कार्यालयातील प्रत्येक इसमाने लाच घेऊनही,
केंद्रातून येणारे 
प्रत्येक पैकेज प्रत्येकाने ओरबाडूनही,
माझा देश अस्तित्वात आहे ! आश्चर्य वाटतं...!!

'अर्थ'पूर्ण राजकारणात सर्वच भ्रष्टाचारी,
गल्ली ते दिल्ली नसे एकही सदाचारी,
तरीही राजकारभार चालू आहे ! 
आश्चर्य वाटतं...!!

शासकीय रुगणालयात सुईपासून औषधापर्यंत घोटाळा,
कधी औषधांचा तर कधी डॉक्टरांचाच  तुटवडा,
तरीही दवाखाना चालू आहे ! 
आश्चर्य वाटतं...!!

'खलरक्षणाय सदनिग्रहणाय' हा देऊनी नवीन नारा,
अपराध्याला नव्हे सापडेल त्याला चेपू असाच प्रकार सारा
करीत पोलीस ड्युटीवर आहे ! 
आश्चर्य वाटते...!!

देशाच्या तिजोरीवर सर्वांचाच भार,
नि सर्वत्र असूनही अनागोंदी कारभार,

तरीही  माझा देश अस्तित्वात आहे ! आश्चर्य वाटतं...!!

तितक्यात होते पिता-परमेश्वराचे स्मरण,
नि उमजते देशाच्या अस्तित्वाचे कारण,
ईश्वर नामाचा नित्य गजर होतो जेथे,
'तोच' कर्ता-करविता नि संचालक असे तेथे,
शिर नतमस्तक होते,
नि शब्द आठवतात,

इये अध्यात्माचीये नगरी ! 
इये अध्यात्माचीये नगरी !!

: अनुप
Composed on 17th April 2012

2 comments: